कुटुंबात वाद होतात? करा हे ३ ज्योतिषी उपाय आणि चमत्कार बघा.

नमस्कार मित्रांनो.

ज्या घरात रोज भांडण होतात. मग ति भांडण सासू सुनेबद्दल असतील, जावा जावा मधील असतील  नवरा बायकोच असतील किंवा अगदी भावा भावांमध्ये अशा प्रत्येक नात्यांमध्ये वादविवाद आणि भांडण होत असतील तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही वास करत नाही आणि मग माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये नसेल तर आपल्या घरामध्ये समस्यांची एक मालिका सुरू होते.

पण मग काय उपाय ज्योतिषशास्त्र इथेच मदतीला येत आणि जेव्हा आपल्या आता बाहेर प्रसंग जातो तेव्हा ज्योतिष शास्त्र आपल्याला मार्गदर्शन करत की नक्की करायचा आहे काय असेच काही उपाय आपण बघणार आहोत ज्यांच्या घरात सतत वादविवाद होतात त्यांच्यासाठी  चला तर मग जाणून घेऊयात.

मित्रांनो ज्योतिषशास्त्र हे अस शास्त्र आहे की ज्याच्या मध्ये सर्व गोष्टींवर उपाय आहेत. जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल. तर हे काही उपाय तुम्ही निश्चितच घरामध्ये करून बघा.

१) जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील सतत एकमेकांमध्ये वाद विवाद होत असतील. ज्योतिष शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की तुम्ही तुमच्या घरात रोज सकाळी मिठाच्या पाण्याने फरशी पुसा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि त्याचबरोबर जर घरामध्ये काही वास्तुदोष असेल तर तोही दूर होतो. पण लक्षात ठेवा की गुरुवारी आणि शुक्रवारी मात्र मिठाच्या पाण्याने फरशी पुसू नका.

कारण या दोन दिवसांमध्ये मिठाच्या पाण्याने फरशी पुसण अशुभ मानला जात.आता जर घरामध्ये काही ग्रहदोष असेल तर काय कराव बर ग्रह नक्षत्राच्या दोषांमुळे जर घरात वाद होत असतील तर त्यामुळे एकदा तरी नवग्रहांची पूजा एकदा तरी घरामध्ये करावी. त्यामुळे कुटुंबात सुख शांतीचे वातावरण निर्माण होते आणि आपल्या कुंडलीमध्ये जर ग्रहमान  खराब असेल तर त्याचाही प्रभाव कमी होतो आणि त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची प्रगती व्हायला लागते. आता ही नवग्रहांची पूजा करायची असेल तर त्यासाठी ज्योतिष तज्ञांचा मार्गदर्शन मात्र घ्या.

२) आणखीन एक उपाय म्हणजे बऱ्याचदा घरातल्या घटकाटी आणि भांडणांचे कारण  पितृदोषही असू शकतो. म्हणूनच मित्रांचा आशीर्वाद मिळाला हवा. अमावस्या किंवा श्राद्ध पक्षात पितरांना तर्पण अर्पण करा आणि प्रत्येक शुभकार्यात पितरांचा ध्यान करायला विसरू नका. कावळा कुत्री पक्षी गाई यांना धान्य वेळोवेळी घालाव . यांनाही पीठ खाऊ घालाव. पिंपळ किंवा वटवृक्षाला पाणी अर्पण करत रहाव. असे केल्याने पितृदोष दूर होतो. पितरांच्या आशीर्वादाने घरात सुख शांती येते.त्याच बरोबर कुटूंबातील सदस्यांना सोबत प्रेम वाढेल.

३) आता जर नवराबायको मध्ये सतत भांडण होत असतील तर त्यावरती ही एक उपाय आहे. खरंतर भांडत नाही ते नवरा बायकोच नाहीत. पण जेव्हा तुमच्या भांडणांचा त्रास बेडरूमच्या बाहेर येऊन बाहेरच्यांना व्हायला लागतो. तेव्हा मात्र घरातील वातावरण खराब होत आणि त्याचे दुष्परिणाम व्हायला लागतात. त्यामुळे जर पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असतील. प्रमाणाच्या बाहेर भांडणे होत असतील, तर एक उपाय करावा. 

पत्नीने रात्री झोपण्यापूर्वी पतीच्या उशाखाली कपूर ठेवावा आणि तो सकाळी जाळून टाकावा आणि नंतर ती राख वाहत्या पाण्यात टाकावी. हा एक वास्तुशास्त्राचा उपाय आहे आणि वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की या उपायामुळे पती-पत्नी मधील प्रेम वाढत त्यांच्यामधील असणारी नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर घराच्या ईशान्य बाजू साजूक तुपाचा दिवा लावा. त्यामुळे सुद्धा पती-पत्नी मधील संबंध दृढ होतात. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा मंगळवारी हनुमानाची पूजा नक्की करावी. 

काल संध्याकाळ हनुमानासमोर पंचमुखी दिवा लावावा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. कारण हनुमानाच्या उपासनेने ग्रह दोष वास्तुदोष सर्वच दूर होत. लक्षात ठेवा रावणाने जेव्हा सर्व ग्रहांना बंधी बनवल होत. तेव्हा हनुमानाने येऊन ग्रहांची सुद्धा सुटका केली होती. यावरून तुम्ही लक्षात घ्याल. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असू द्या कोणताही दोष असू द्या हनुमानाच्या उपासनेने तो दूर होतो.

आता काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही घरात चुकूनही करू नका. कारण त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढत. कोणत्या आहेत त्या गोष्टी.

१) अनेकांना पलंगावर बसून जेवण्याची किंवा पलंगावर बसून काहीतरी खाण्याची सवय असते. असं चुकूनही करू नये.वास्तुशास्त्रानुसार अस केल्यामुळे घरामध्ये भांडण वाढतात. २) किचनमध्ये उष्टी खरकटी भांडी रात्रभर ठेवू नयेत.

३) तेच बाहेरचे बूट चप्पल घरात घेऊन येऊ नये. तुम्ही बाहेरच्या समस्या घरात आणताय असाच त्याचा अर्थ होतो.

४) अंथरुणावर बसवून घेऊ नये. आणि स्वयंपाक घर नेहमी नीटनेटका स्वच्छ ठेवावे. ५) त्याचबरोबर तुमच्या कुलधर्म कुलाच्या नेहमीप्रमाणे व्यवस्थित पाळावेत. त्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद घरावर राहतो. कोणत्याही संकटापासून आपली सुटका होते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *