झाडूला लक्ष्मीचे रूप का मानले जाते? काय आहे यामागील शास्त्रीय कारण जाणून घ्या येथे.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो झाडू ही एक अशी वस्तू आहे की ती सर्वांच्या घरी असतेच. झाडूला लक्ष्मीचे रूप ही मानले जाते शेवटी झाडू हा लक्ष्मीचे रूप का आहे असे असा प्रश्न सगळ्यांनाच असतो. घरातील कचरा घाण बाहेर पडले की स्वच्छता पवित्रता व संपत्ती घरात आपोआपच येते. लक्ष्मी माता अशाच वेळी घरात प्रवेश करते. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते. झाडू खरेदी करताना खूप नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत.

जर तुम्हाला झाडू खरेदी करायचा असेल तर तो शनिवार रविवारी खरेदी करा. तिवारी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्हाला झाडू बदलायचा असेल तर तो शनिवारीच बदला. तुम्ही जेव्हा नवीन घरात झाल तेव्हा नवीन झाडू घ्या वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण व पश्चिम दिशेला झाडू ठेवण्यात अत्यंत शुभ आहे. जर शक्य असेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी कोणाचे लक्ष जाणार नाही.

स्वयंपाक घरात व धान्य साठवण्याच्या खोलीत झाडू ठेवू नये. यामुळे गरिबी आणि रोगराई पसरते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा झाडू कधीही जाळू नये. कधी कधी रात्री झाडू मारावा लागतो तरी त्याचा कचरा दुसऱ्या दिवशी टाकावा. झाडू कधीही उभा ठेवू नका नेहमी आडवाच ठेवा .

जर एखादी व्यक्ती तुमच्या घरातून बाहेर पडली तर लगेच झाडू मारू नये किमान अर्ध्या तासाने झाडू मारावा. झाडू वर पाय ठेवल्याने महालक्ष्मीचा अनादर होतो. जर चुकून झाडूला पाय लागल्यास झाडू समोर नतमस्तक होऊन क्षमा मागावी.

झाडू बद्दल अनेक मनोरंजक गोष्टी देखील आहेत. रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजासमोर झाडू ठेवून झोपावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीच्या सणाला आपण धनत्रयोदशीला आपण झाडू खरेदी करणे आवश्यक आहे.

तसेच आपल्या घरातला झाडू व देवघरातील झाडू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावा . घरातील साफसफाई साठी तुटलेल्या झाडूचा वापर करू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहे असे केल्याने घरात नकारात्मकता पसरते आणि घरामध्ये वाद विवाद होतात. घरात साफसफाई केल्याने घरातील नकारात्मकता संपते.

त्यामुळे घरातील साफसफाईसाठी ओला किंवा खराब झालेला झाडू वापरू नये. लक्ष्मी नाराज होते व तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तुशास्त्रात झाडू जाळण्यास मनाई आहे. असे म्हणतात की झाडू जाळल्याने तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो. 

यासोबतच घराच्या छतावर झाडू ठेवण्यास मनाई आहे. सूर्यास्तानंतर घर झाडणे ही मनाई आहे .असे म्हणतात, की रात्री झाडू मारल्याने लक्ष्मी घराच्या बाहेर जाते. पूजेच्या ठिकाणी वापरण्यात आलेला झाडू इतर कोणत्याही ठिकाणी वापरू नये.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *